शिक्षण आणि समाजव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणारा ‘ निबार ‘
चित्रपटाला मिळत आहेत ⭐ ⭐ ⭐
ध्रुव फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्माते संतोष भणगे, अनिकेत माळी आणि भरत सावंत यांनी ‘निबार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते जितेंद्र भास्कर ठाकरे असून, दिग्दर्शनाची जबबदारी सुनील शिंदे यांनी सांभाळली आहे. ‘निबार’ हा चित्रपट शाळाबाह्य मुलांची कथा सांगणार असल्याचे ट्रेलर पाहताच जाणवते. यातील शशांक केतकरने साकारलेली शिक्षकाची व्यक्तिरेखा मनाला भावणारी आहे. मूल जन्माला येताच प्रत्येक आई-वडील त्याच्या भवितव्याबाबत विचार करू लागतात. त्याला सर्वोत्तम शाळेत दाखल करून शिक्षीत करण्याकडे त्यांचा कल असतो, पण जगात असेही काही आई-वडील आहेत, जे मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी त्यांच्याकडे कमाईचे साधन म्हणून पाहतात. अशाच शाळेत न जाणाऱ्या मुलांची गोष्ट ‘निबार’मध्ये पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात पाच मुले मुख्य भूमिकेत असून, शशांक केतकरने साकारलेला शिक्षक लक्ष वेधून घेतो. शशांकला सायली संजीवने सुरेख साथ दिली आहे. चित्रपटातील गीत-संगीत मनाला भिडणारे असून, छायालेखन आणि वास्तवदर्शी लोकेशन्स कथानकाला अचूक न्याय देणारे आहे. दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि कुशल दिग्दर्शन ‘निबार’च्या जमेची बाजू असल्याचे जाणवते.
शशांक केतकर, सायली संजीव, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, अरुण नलावडे, शांता तांबे, राजेश दुर्गे, अनिकेत माळी आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘निबार’ची पटकथा व संवादलेखन राजेश दुर्गे आणि सुनिल शिंदे यांनी केले आहे. छायालेखन धनंजय कुलकर्णी यांनी, तर संकलन सुनिल जाधव यांनी केले आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. आदर्श शिंदे तसेच रोहित राऊत या मराठी रसिकांच्या आवडत्या गायकांनी या चित्रपटातील गीते गायली आहेत. सतिश बिडकर यांनी कला दिग्दर्शन केले असून, साऊंड डिझाईन अभिजीत देव यांनी केले आहे. शिरीष राणे कास्टिंग व लाईन प्रोड्युसर, तर अमोल गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.
‘निबार’ ची कथा ही एका सहानुभूतीशील मुख्याध्यापकाची हृदयस्पर्शी कथा आहे जो विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमता शोधतो. हा चित्रपट शिक्षण आणि समाजव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करतो.
सामाजिक विषय: हा चित्रपट सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर आधारित असल्यामुळे, तो प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो.
* दिग्दर्शक आणि लेखक: सुनील शिंदे
* निर्माता: संतोष भानगे
* छायाचित्रण: ओमकार धनंजय कुलकर्णी
* संकलन: सुनील जाधव
* संगीत: रोहित नागभिडे (पार्श्वसंगीत), नेहा आदर्श शिंदे, रोहित राऊत (गायक)
* गीतकार: वैभव देशमुख
* कलाकारांचा संच: शशांक केतकर आणि सायली संजीव हे मराठीतील लोकप्रिय चेहरे आहेत, तर शशांक शेंडे यांच्यासारखे अनुभवी कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असल्यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट सरस झाला आहे.