२३ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या १००व्या नाट्यसंमेलनाचा सांगता समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे.
२३ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या १००व्या नाट्यसंमेलनाचा सांगता समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. याबद्दल सांगताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी सांगितले की, रत्नागिरी नाट्यसंमेलन सांगता समारंभ आयोजित करणाऱ्या शाखा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. सांगता समारंभ भव्यदिव्य करण्याच्या दृष्टीने त्यांना अधिक वेळेची आवश्यकता आहे असं कळलं . त्यामुळे रत्नागिरी येथील संमेलन पुढे ढकलण्याची त्यांनी विनंती केली याबद्दल शाखा पदाधिकाऱ्यांची विनंती रास्त वाटल्याने लवकरच नियामक मंडळाची सभा आयोजित करण्यात येईल. त्या सभेतील चर्चेनंतर सांगता समारंभाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. बोरिवली येथील एकशेएकावे नाट्यसंमेलन मोहन जोशी ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्याच्या दृष्टीने त्यानंतर पावले उचलली जातील.
अजित भुरे
प्रमुख कार्यवाह































