मुंबईत पावसाने धुमशान घातले असून ठीक ठिकाणी सकळ भागात पाणी साठले आहे. रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे तर कित्येक ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना करायला लागत आहे. रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात देखील झालेली आहे.
प्रशासनाने मुंबईत 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला असून आज दुपारच्या क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्यात आलेले आहेत.

वाशी बाजारपेठेमध्ये पाणी साचले.
सायन माटुंगा रेल्वे ट्रॅक वर पाणी साचले
2006 नंतर पहिल्यांदाच वरळी नाका येथे पाणी साचले
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
माटुंगा आणि सायन मध्ये , मध्य रेल्वे थांबली 12.41
संध्याकाळी साडेसहा वाजता समुद्राला भरती येणार असून त्यावेळेस पाऊस असल्यास कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता
चेंबूर मध्ये सात झोपड्यांवर भिंत कोसळली
































