कोण ठरणार ‘मि. 420’…? 

कोण ठरणार ‘मि. 420’…?

सध्या मराठी रंगभूमीवर, कोण ठरणार ‘मि. 420’ असा प्रश्न विचारला जात आहे. कारण याच नावाचे आगळेवेगळे असे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. निखळ मनोरंजन करणारे हे नाटक असल्याने प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल. फूल टू पैसा वसूल, असे हे नाटक आहे. ‘मि. 420’ हे नाटक संतोष जगताप यांनी लिहिले असून, प्रदीप वेलोंडे यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. भूषण घाडी, अक्षय पाटील, दक्षता जोईल, डॉ. संदीप वंजारी, प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत हे कलावंत या नाटकात भूमिका रंगवत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने मराठी मालिकांतील कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत.

महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना व दत्ता भाटकर यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे. डॉ. संदीप वंजारी व संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. या नाटकाची निर्मिती ‘श्री दत्त विजय प्रॉडक्शन’ या नाट्यसंस्थेने केली आहे.  ‘मि 420’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिरात होणार आहे.

IPRoyal Pawns